ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते
  • Aavaj Daily Team
  • Fri 26th Sep 2025 08:28 am

कराड/प्रतिनिधी : -

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर मोबाईलपासून दूर रहा, एखाद्याला माफ करा आणि कान भरणाऱ्यांपासून सावध राहा. संकटे त्यांच्या वाट्याला येतात, ज्यांची ती पेलायची ताकद असते. एक दार बंद झाले, तर शंभर दारे उघडतात. त्यामुळे संकटाच्या छाताडावर पाय द्या, यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. विनोद बाबर यांनी केले.

कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयातर्फे आयोजित 93 व्या व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प गुंफताना ‘संकटे त्यांच्या वाटायला येतात, ज्यांची पेलायची ताकद असते' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे सेवानिवृत्त अभियंता ए.आर. पवार होते. यावेळी लेखापाल गंगाधर जाधव, प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव, प्रा. बी. एस. खोत उपस्थित होते.

मोबाईलने जग जवळ आणले असले, तरी माणसे मात्र दुरावली, असे सांगताना प्रा.डॉ. बाबर म्हणाले, मोबाईलने लोकांना मानसिकदृष्ट्या आजारी केले. मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचा हट्ट आणि गेम्समुळे पिढी भरकटली, तर ती पालकांची जबाबदारी आहे. एआयने तर आता कृत्रिम व्यक्ती आपल्या आयुष्यात शिरल्या आहेत. हसणं, रडणं, बोलणं सगळं कृत्रिम झालंय. पण खरी सोबत तंत्रज्ञान देऊ शकत नाही. खरी मैत्री तीच, जी संकटाच्या काळात धावून येते. सकाळी एकमेकांशी भांडलात, तरी संध्याकाळी एकत्र या. आपली माणसे दुखावली असतील, दुरावली असतील तर, मोठ्या मनाने त्यांची माफी मागा आणि त्यांनाही माफ करा, यामुळे मन व मेंदूवरील ताण कमी होईल. डोक्यात नेहमी सकारात्मक विचार ठेवा. सुख आलं की दुःखही येणार, जसं दिवसानंतर रात्र येते. पण प्रत्येक रात्रीनंतर नवी पहाट उगवते, म्हणून सूर्याप्रमाणे जगा. यश आलं तरी थांबू नका, अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत वाटचाल सुरू ठेवा. घरच्या उंबऱ्यावर व्यवसायाच्या चिंता आणू नका, कुटुंबासाठी वेळ द्या. देवाने दिलेले शरीर खूप मौल्यवान असून, निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे, असे त्यांनी सांगितले.

देव सगळं माफ करतो, पण कर्माची फेड येथेच करावी लागते. त्यामुळे जादूटोणा, कर्मकांडात अडकू नका. देव कोणाचेही वाईट करत नाही. आपल्या कामात देव शोधा. संत सावता माळी यांनी कांदा, मुळा, भाजीमध्ये देव पाहिला, तुकोबांनी 'देवाच्या भेटीला गेलो देवाची झालो' या दोह्याच्या आधारे स्वतःमध्ये व आपल्या कामामध्ये देव पहा, असे सांगितले. आई-वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट सोसलेत, याची जाण ठेवा. आज मात्र आई-वडील वृद्धाश्रमात अन्‌‍ मुलं महागड्या शाळेत, ही शोकांतिका आपणच घडवतोय, याची जाणीव ठेवा, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी, प्रतिमापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागत अमोल जाधव यांनी, परिचय गंगाधर जाधव, सूत्रसंचालन सुहास इनामदार, तर अनिल थोरात यांनी मानपत्र वाचन करून आभार मानले. व्याख्यानास ग्रंथपाल महेंद्र लोखंडे, सेवानिवृत्त ग्रंथपाल संजय शिंदे, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

कराडकरांचा उस्फूर्त प्रतिसाद 

कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयातर्फे यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे आयोजित केलेल्या व्याखानमालेत प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते व शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे व्याखान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानास कराडकरांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनचा हॉल पूर्णपणे तुंडुब भरून नागरिकांनी जागा मिळेल तिथे उभे राहून व्याख्यान ऐकले.

शिवरायांचा आदर्श व कृष्णासारखा मित्र 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकटांतून उभ्या राहिलेल्या धैर्याचा आणि अफजलखान वधाचा दाखला देत प्रा. बाबर म्हणाले, नेपोलियन, अलेक्झांडर जगज्जेते होते. परंतु, नीतीमूल्ये आणि तत्वांमुळे शिवराय आजही प्रत्येकाच्या मनामनात जिवंत आहेत. त्यांच्याप्रमाणे संकटांना खिंडीत गाठून त्यांचा समूळ नायनाट करा. मनात जिंकायचं ठरवा, मग जगातील कुठलीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही. तसेच महाभारतातील कृष्णाप्रमाणे संकटकाळी मार्गदर्शक मित्र हवा. जो सुखदुःखात साथ देतो, तोच खरा मित्र ठरतो, असेही त्यांनी सांगितले.

जगासाठी प्रेरणादायी स्टेटस निर्माण करा 

आपण कोणाच्या संगतीत राहतो, हे तपासा. त्यावरून आपलीही किंमत ठरते. चांगल्याची संगत धरा. आपल्या व इतरांच्या मोबाईलवरील स्टेटस आयुष्य ठरवत नाही. छत्रपती शिवरायांसारखे स्टेटस निर्माण करा, जे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असेल. असेही त्यांनी सांगितले. 



©2026. All Rights Reserved.