प्रतापगड : 'जय भवानी जय शिवाजी' हा जयघोष आणि 362 मशाली यांनी किल्ले प्रतापगड उजळून निघाला. प्रतापगडावर मशाल महोत्सव हा शिवभक्तांसाठी पर्वणी असते. त्यामुळे शिवभक्त प्रतिवर्ष मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केली . जय भवानी जय शिवाजी' हा जयघोष आणि 362 मशाली यांनी किल्ले प्रतापगड उजळून निघाला. प्रतापगडावर मशाल महोत्सव हा शिवभक्तांसाठी पर्वणी असते. त्यामुळे शिवभक्त प्रतिवर्ष मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. प्रतापगडवासिनी भवानी मातेच्या मंदिरास 362 वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधत नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर दाखल झाले. प्रतापगड, महाबळेश्वर,सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली आदी परिसरातून दाखल झालेल्या शिवभक्तांनी प्रतापगडावर मशाली पेटवल्या.
©2026. All Rights Reserved.